सावधान बळीराजा दुष्काळ येतोय….

सावधान बळीराजा दुष्काळ येतोय….

🌱वि४🌿 या व्हाट्सअप्प ग्रुपवरून

सावधान बळीराजा दुष्काळ येतोय….

source:- INTERNET

अक्षय गांवकर
ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग

या वर्षी सरासरी पाऊस कमीच पडला. तरी बरीचशी धरण भरली गेलीत. काही जेमतेम भरली गेलीत. आज महाराष्ट्र दुष्काळाच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रातला बळीराजा दुष्काळग्रस्त असुनही सरकार कडुन कोणतही ठोस पाऊलं उचलल जात नाही आहे. जगाचा पोशिंदा दुष्काळात सापडला तर त्याला मदत करण हे सरकारच काम आहे ते ही होताना दिसत नाही. शेवटी त्या मायबाप शेतकय्रा जवळ कोणताही पर्याय उरत नाही आणि आपल जीवन संपवण्या शिवाय त्यांच्या समोर कोणताच मार्ग राहत नाही.

पण माझ्या कोकणात तस होताना दिसत नाही. कोकणी शेतकरी आत्महत्ये सारख टोकाच पाऊल उचलत नाही. माझ्या कोकणात तस बघीतल तर दुष्काळ पडत नाही. तरीही नैसर्गिक आपत्ती ही इथल्याही शेतकर्यास चुकलेली नाही. देवाच्या कृपेने लाभलेला हिरवागार निसर्ग त्यामुळे पावसाची समस्या भासत नाही. पण कधी-कधी हाच पाऊस शेतकय्राचा कर्दनकाळ बनुन समोर येतो. आत्ताच दोन दिवस अगोदर विजेच्या कडकडासह पाऊस जोरदार पडला. कापणीला आलेल्या भात शेतीच नुकसान करुन गेला. असा अवेळी आलेल्या पावसाला गावाकडे अवकाळी आऊस बोलले जाते. या पावसाने शेतकय्राच पावसाळ्यात केलेल्या ३,४ मीहीन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवल. पाऊसामुळे हाता तोंडाला आलेला घास मातीमोल झाला. कापणीला आलेल्या भात शेतीचा दाणा अक्षरशा पावसच्या सरी ने गळुन पडला. याची नुकसान भरपाई सरकार कडुन भेटनार नाही. गरीब शेतकय्राला पिका पासुन आणि कष्टा न पिकवलेल्या धान्या पासुन वंचित रहावे लागेल.
आंबा काजु हे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर मेहनत घेतली जाते. पण वर्षभराची मेहनत केव्हा हातुन निसटते समजतही नाही. जेव्हा आंबा काजु या झाडांन्ना मोहर यायला लागतो त्याचवेळी अवकाळी पाऊस किंवा पिसाळलेला वार आला की झाडावरचा मोहर गळुन पडतो. पुन्हा त्या झाडाला मोहर येण कठीण होवुन जात. असा पाऊस किंवा जोरदार वारा आला की शेतकय्राचा अक्षरशा जिवच घेतो. कारण त्या मागे वर्षानु वर्षे झाडांची जोपसना करुन केलेली मेहनत असते. कधी-कधी कडक उन्हाळ्याच्या महीन्यात संपुर्ण जमनिवर सुकलेल गवत असल्यामुळे. कुठेतरी चुकुन लागलेली आग संपुर्ण बाग बेचिराख करुन टाकते. असे प्रसंग माझ्या कोकणात अनेक वेळा घडताना बघितले. पण झालेल्या नुकसानीचा मोबदला भेटताना कधी बघीतला नाही.. असा अवकाळी पाऊस झाला किंवा शेतीच नुकसान झाल तर कोणताही सरकारी अधिकारी तपासणीसाठी येत नाही. जरी पंचनामा झालात तर योग्य नुकसान भरपाई भेटत नाही. सरकार कडुन दुष्काळ ही जाहीर होत नाही. अशाने माझा शेतकरी मायबाप आलेल्या संकटाला सामोरे जातो. मेहनतीच फळ आज ना उद्या भेटनारच या आशेवर जगतो. पण फासावर लटकत नाही. म्हणुन मला माझ्या कोकणी शेतकय्राचा अभिमान वाटतो.

यामधे मला कुठेही तुलना करायची नाही आहे. पण तरीही आपली काटक वृत्ती, कमी गरजा तसेच समाधानी असल्याने कोकणी शेतकरी आलेल्या संकटांना देवाक काळजी रे म्हणत तोंड देत असतो. आणि आपल जीवन जगत असतो.

source:- INTERNET

अभिजीत गोडसे ,
सातारा

             नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे आता नेहमीच येतो दुष्काळ असे म्हणण्याची आता आपल्या सर्वांनाच सवय झाली आहे. दुष्काळ हा काही नवीन नाही. अगदी प्राचीन काळात ही दुष्काळ पडला होता. गेल्या दशकात अनेक वेळा दुष्काळ पडला. येथून पुढेही पडणार आहे. यावर मात कशी करायची हा खरा आपल्या सर्वांन पुढे प्रश्न आहे. दुष्काळ हा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आहे. नैसर्गिक दुष्काळामध्ये पावसाची अनिश्चितता , तापमान वाढ , वातावरणात झालेले बदल इ. घटक येतात. तर मानवनिर्मित दुष्काळामध्ये पाण्याचा अमर्याद उपसा , लोकसंख्या , शेतीसाठी वापरली जाणारी खते इ. घटक येतात. खर तर नैसर्गिक दुष्काळ हा आपल्या हातात नाही . पण मानवनिर्मित दुष्काळ हा आपल्या हातात आहे. यासाठी योग्य त्या सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. भले दुष्काळ कोणताही का असेना. यासाठी सावधान फक्त बळीराजाने होण्याची गरज अजिबात नाही. त्याने एकट्याने काही दुष्काळाचा पतकुर घेतलेला नाही. दुष्काळामध्ये त्याचे सर्वात जास्त नुकसान होत हे खरे. पण   सिमेंटच्या जंगलात राहणारी आणि घरात मोठ्या पडद्यावर दुष्काळाचे दाहक चिञ पाहणारी मंडळी उन्हाळा सहण न झाल्याने देवाघरी गेली आहेत . सावधान अशा मंडळीनी देखील होणे गरजेचे आहे.

             मुळात सावधान होण्याची गरजच का पडते ?  दुष्काळ आला की सरकारच्या नावाने टाहो फोडायचा. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करायची. यंदा तर सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. दुष्काळातील  तालुक्यात मुलांच्या शाळेची फी माफ , लाईट बील माफ , शेतसारा माफ इ. सर्व सुविधा दिल्या गेल्या. पण दुष्काळ हटवण्ची जबाबदारी फक्त सरकारीची आहे का ? सरकारी पातळीवर सरकार मदत करते हा भाग वेगळा. ते त्यांनी केले पाहिजे. पण आपण काय करतो ? किमान नैसर्गिक नाही पण  मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी तरी झटतो का ? पाण्याचा वापर कमी करतो का ? झाडे लावतो का ? हे प्रश्न आपल्या मनाला प्रत्येकाने विचारले पाहिजे. ग्रामीण भाग सोडा. तेथे बळीराजा वर्षेभर निसर्गाच्या सानिध्यांत आहे. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची त्याची धमख आहे. हे शहरवासी मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी काय काम करतात ? विज मुबलक मिळते , पाणी मुबलक मिळते सर्व सुविधा मिळतात. यामुळे अशांना दुष्काळ कशाबरोबर खातात   हेच मुळात माहिती नाही . छोट्याशा कुंडीत फुलाच झाड लावण्यापलीकडे यांची समज जात नाही. ते ही झाड घराची शोभा वाढवण्यासाठी लावलेले. मेक आहे ते येथे आहे. घरातील माध्यमांच्या पुढे बसून दुष्काळाची चित्रे पाहून दुष्काळ कमी होणार नाही. काही सामाजिक संस्था दुष्काळाला हरवण्यासाठी आणि एकूणच गाव पाणीदार करण्यासाठी ,जमिनीचा पोत सुधारण्यासाठी झटत आहे. उदा. पाणी फाउंडेशन. अशा लोकचळवळीत ग्रामीण भाग तर आहेच आहे. पण यात निरघंट्ट शहरी लोकांनी देखील  सामील होऊन दुष्काळाला हटवण्यासाठी मदत केली पाहिजे. यासाठी त्याला गावागावात जाऊन जमेल त्या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. दुष्काळ सर्वान साठी आहे. एकट्या बळीराजासाठी नाही.

           दुष्काळाचा संबंध हा  थेट आर्थिक घटकांशी आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर दिसून येईल. आज मराठवाडा , विर्दभ , उत्तर महाराष्ट्र आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र अशा ठिकाणी किती लोकांचे हाल होतायत ते जाणकारांनी तेथे जाऊन पहावे. दुष्काळ आला की पाणी टंचाई वाढते,  उभे असलेली पिके नष्ट होतात. आणि येथेच आर्थिक प्रश्न उभा राहतो. याच्यात सर्वात जास्त हाल होतात ते महिलांचे पाणी आणण्यासाठी दोन - तिन किलोमीटर पायपीट करून जावे लागते . गावात टँकर आला की माता - भगिनी यांची उडालेली झुंबड आणि अशातून पुन्हा होणारी भांडणे , चिडचिड ,  पाणी आणण्यासाठी लांब जावे लागल्यामुळे लहान मुलांची बुडणारी शाळा. असे असंख्य प्रश्न आहेत. जे की दुष्काळामुळे उभे राहिलेत . यासाठी आता फक्त बळीराजाला सावधान करण्यात काही अर्थ नाही . सावधान तर सबंध माणव जातीने झाले पाहिजे .

source:- INTERNET

वाल्मीक फड ,
नाशिक

दुष्काळाचा सवॉत जास्त फटका हा बळीराजाला प्रथम बसतो म्हणून हे शिषॅक एकदम योग्य बसते.बघा दुष्काळ येतो तो काही ठराविक घटकांसाठी येत नाही,तो येताना अनेक समस्या घेऊन येत असतो.परंतु सगळ्यात जास्त फटका हा शेतकर्याला बसतो.कारण की, दुष्काळ आला की,जे शेतकरी बियाणे जमिनीत टाकतात त्याची उगवण होते आणी काही दिवसात ते पिक पुणॅपणे जळून जाते आणी केलेला खचॅ आणी सगळीच मेहनत वाया जाते पयॉयाने आथीॅक नुकसान होते.दुष्काळ म्हटलं की,शेतीवर अवलंबून असणारे शेतमजूर तसेच शेतीसाठी लागणारे अौषधे खते यांच्या कंपन्या ,दुकाने अशा अनेक घटकांवर त्याचा फार मोठा परीणाम होतो.म्हणून माझे तर असे मत आहे की,बळीराजाला सावध करण्यापेक्षा सरकारला सावध केलं पाहीजे.फ्री वायफाय हे असे बिनकामाचे ऊद्योग करण्यापेक्षा प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी कालवे काढावे,नद्या,जोडाव्या. ह्या गोष्टींवर जर खचॅ केला पाहीजे मला माहीत आहे कारण मी स्वता एक शेतकरी आहे.बळीराजाची जर खरोखरच जर काळजी वाटत असेल तर हे काम करायला पाहीजे.ज्या भागात पाऊस जास्त पडतो त्या भागातुन जे कायम दुष्कळी प्रदेश आहेत त्यांना कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहीजे.३०० वषॉपुवीॅ शिवाजी राजांनी गडावर पिण्याच्या वषॅभर सोय केली होती तर आता कोणती गोष्ट अशक्य आहे.म्हणून सांगतो बळीराजाला पाण्याची सोय आणी त्याच्या मालाला योग्य ऊत्पादन खचाॅच्या दिडपट भाव मिळाला तर त्यालाही आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता येइल,चांगली दिवाळी साजरी करता येइल.बळीराजा आपल्याला सावरायला कोणी येणार नाही म्हणून सांगतो आपले जीवाचे लाडके बैल सजॉ राजाला खाटकास विकू नको त्याच्या चार्यापाण्याची सोय आत्ताच लाऊन ठेव कारण जवळजवळ ८ते९महीने तुला सांभाळायचे आहेत.सरकारच्या भरवशावर राहू नको कारण तु कजॅमाफी पाहीलीय ना?कशातच काही नाही आणी म्हणे कजॅमाफी केली.म्हणून हे बळीराजा सावध हो आणी आपलं कुटूंब आणी आपल्या पशुधनाला सांभा ळ     सावध हो भाऊ सावध हो.
source:- INTERNET

सौदागर काळे,
पंढरपूर.

बळीराजा.......तुला कुठून सावधान करावं.तुझं नाव ज्याने कायम तू बळी जात रहावे म्हणून बळीराजा ठेवलं त्याच्यापासून करायचं की ज्याने 'भारत हा कृषिप्रधान देश आहे' हे वाक्य पुस्तकात अभिमानाने की जबरदस्तीने घुसवले त्याच्यापासून.खरंतर तुला बळीराजा म्हणतानाच लाज वाटली पाहिजे आम्हांला,एवढी वास्तविक बेकार अवस्था आहे सध्या.यंदा पाऊस खूप कमी झाला.तू मराठवाडा, विदर्भाचा असेल तर तेथील परिस्थिती खूपच वाईट. तुझ्या आयुष्यात दुष्काळ येत नाही तर तुझ्या जन्माबरोबर चिकटवला आहे,या व्यवस्थेने.पाण्याच्या दुष्काळासाठी तुला आम्ही सावधान करणं म्हणजे मास्तराची शाळा घेतल्यासारखी.म्हणून त्या नादात पडत नाही.

तुला सावधान करावंसं वाटतं आहे काही बाबींसाठी. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तुझ्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यापासून,सरकारच्या मोठया पॅकेजच्या घोषणांपासून, तुझे भांडवल करणाऱ्या प्रसारमाध्यमांकडून,गावच्या तलाठ्यापासून,शेतकरी चळवळी मॅनेज करणाऱ्या नेत्यांकडून,तुला छोटीशी मदत देतानासुद्धा सेल्फी काढणाऱ्यापासून, सोशल मीडियातून तुझ्यासाठी प्रमाणाच्या बाहेर भावुक होणाऱ्यासाठी,तुझ्या आत्महत्येचा बाजार मांडणाऱ्या राजकारण्यापासून,तू जगाचा पोशिंदा आहे हे मिरवणाऱ्याकडून,तुझ्यासाठी प्रत्येक वर्षी परिसंवाद आयोजित करणाऱ्यापासून,फिल्म बनवणाऱ्यापासून, प्रत्येक योजनेचा लाभार्थी करताना तुझ्या अंगावरचे कातडेही न सोडणाऱ्याकडून आणि जे फक्त आभासी डोस पाजत राहतात अशा माझ्यासारख्याकडून. बाकी काय पाऊस पुढच्या वर्षीही पडेल...पण पाण्याच्या नियोजनशून्यतेचा दुष्काळ पडतच राहील.कारण त्यातच अनेक वित्त- हितसंबंधी लाभार्थी दडलेले आहेत.नेमेची दुष्काळात अशा लोकांचा तुझ्या आयुष्यात खूप सुकाळ झाला आहे.यांना रोखण्यासाठी यंदाच्या दुष्काळात जरा सावधान हो.....

source:- INTERNET

अनिकेत कांबळे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

बळीराजा म्हंटल की साहजिकच आठवतो तो म्हणजे दानशूर बळी राजा ज्याला वामन बटू ने पाताळात गाडलं, परवाची गोष्ट आमच्या गावामध्ये बलिप्रतिपदा निम्मित बळी महोत्सव पार पडला...पण देशाला आजच्या बळीराजाची जाण अजूनतरी पडली नाही..
     पण खऱ्या अर्थाने गेल्या 60-70 वर्षात जेवढ्या आत्महत्या पाहिल्या नाहीत तेवढया या 4 वर्षात पाहिल्या...आमचं राहणं तर शाहूंच्या कोल्हापुरातील. आम्हाला दुष्काळाची झळ काय समजणार, पण एका कवी ची दुष्काळी कविता वाचली मन सुन्न झालं...

"बापाला कापसाच्या कर्जाचं एवढं बोझ झाल..
की जाताना नाकात दोन बोळ कापूस घेऊन गेला..फक्त"
 
 बळीराजा आता तू कुणाच्या  आधारावर राहू नकोस एवढीच विनंती आहे ,कारण इथं तुझ्या फाटक्या पायाची आणि जमिनीची कागदपत्र फायलीत गुंडाळून थंडीत शेकायला ठेवल्यात, तुझ्या पावसाचा दोरा आता तुलाच सापडणा झालाय तू कुठं तुझी जमीन शिवणार येड्या,
"ये सरकार वो सरकार दलाल भडवो की सरकार.."
अस तू मोर्चात म्हंटलास पण तुझी आशेची स्वप्न पाण्याचं फवारणी करून तुला तुझा हक्क हिरावून घेतला...
     माहीत आहे तुझ्याकडे आता पाण्याचा दुष्काळ आहे,पण तू ज्या माणसांनी तुझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत त्यांनाच परत निवडून नको देऊ,जो तुझ्यासोबत अजूनही खंबीर पणे साथ आहे त्यालाच साथ दे,नाहीतर सावधान तुला आयुष्य पुन्हा गुंडाळून ठेवावं लागेल कुठल्यातरी फांदीला बैला संगटच....
       तुला ज्यांनी आशेची गाजरं दाखवणाऱ्या भडव्या राजकारणात आता तू पडू नको तू स्वतःचा उद्धार स्वतः कर,इथं तुला जगाचा पोशिंदा पण तुझ्या व्यथा फक्त कागदावरच राहिल्या बघ,
आता तू तुझाच कागद घे आणि तुझी आशा लिहून कुठेतरी झाडाच्या फांदीवर नको ठेऊ कारण तू जातो र पण माग राहणाऱ्या माणसांनी कुणाकडे बघून जगायचं सांग बर..तू स्वतःच भविष्य स्वतः गिरीव आणि दाखवून दे जगाला अजूनही लाथ मारिन तिथं पाणी काढीन...अशी तुझी ताकद...


source:- INTERNET
शीतल शिंदे ,  
दहिवडी जि. सातारा

सावधान ...
बळीराजा ...सावधान ..
शेतकरी बांधवांनो !  दुष्काळ येतोय सावधान !

दुष्काळ काय आपल्या पाचवीलाच पूजलाय .पण काय करणार निसर्गाच्या पुढे कोणाचे काय चालणार ? त्याच्या पेक्षा कोणीही मोठा नाही .पण जे आपल्या हातात आहे ते तर आपण करू शकतो ना ? मानव निर्मित दुष्काळ आपण टळू शकतो .झाडे लावणे , पाण्याचा अति वापर टाळणे , पाणी अडवून जीरवणे , शेततळे , बांध अडविने जंगल तोड रोखणे ,  इत्यादी गोष्टी करून आपण पाणी जतन करू शकतो .
ज्या प्रकारच्या प्रदेशात राहत असाल त्या प्रदेशाणूसार फळबागा , झाडे , उष्ण बिना पाण्याच्या  वातावरणात येणारी झाडे व फळे असे थोड़े थोड़े विभागून पिके घ्या .जेणेकरून काहीतरी हाती लागेल .एकाच प्रकारचे पिके घेतल्याने कधी कधी  फार मोठे नुकसान होवू शकते .म्हणून विचार पूर्वक शेती करा .
नफा झाल्यास सर्व खर्च करू नका .बुडीत भांडवल बाजूला काढून ठेवा .भविष्याचा विचार करून मगच खर्चाचे पाऊल उचला .कर्ज काढून लग्न हुंडा देत बसू नका .शासनाने विवाह मेळावे आयोजन केलेले असते त्याचा फायदा घ्या .शासकीय योजनांचा लाभ घ्या .वेळीच बचत ठेवा .शेतीला जोड व्यवसाय करा .

दुष्काळ पडला तर न डगमगता धीराने सामोरे जावा !
दुष्काळावर शांतपणाने मात करा !
जीव देई पर्यंत एवढे कमजोर होवू नका !
आज दुष्काळ आहे उद्या सुकाळ येईल !
तूमच्या जाण्याने कोणाचे काहीही जाणार नाही ! जाईल ते फक्त तूमच्या कुटुंबाचा आधार !
अनाथ होतील ती तुमचे मुले!  पोरकी होतील तुमची घरची मंडळी !
व्रुद्ध आई वडील पहा !
तूमच्या दावणीला बांधलेले सर्जा राजा पहा !
खचून जावू नका !
आत्महत्या करू नका !
लाख मोलाचा जीव आहे तुमचा ! त्याची किंम्मत नाही करता येणार!
मर्दा सारखे जागा ! जागलात तर
करोड रूपए कमावाल!
पण जीव मात्र घालवू नका !
दुष्काळात आप्तेष्टांची मदत घ्या !वेळ पडली तर तात्पुरते स्थलांतर करा !
पण जीव मात्र देवू नका !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************